- मात्र, शहरीकरणाच्या वाढत्या विस्तारावर नियंत्रण व उपाययोजनेचे काय?
- ‘न्यूज पीसीएमसी’ प्रथम वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला केलेला उहापोह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०१९) :- दिवसागणिक दोन पिढ्यामधलं अंतर खूप कमी होत चालले आहे, असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे शहरातील विकासाची गती खूप वेगवान झालेली दिसते. त्यामुळे शहरातील मागील काही वर्षामधील विकासाचे चित्र खूपच बोलके आहे. इथे विकासाची गती बदलली की गुंतवणुकी साठीची परिमाणे बदलतात. इतर काही गोष्टी याला अपवाद ठरूही शकतील पण, हे शहराच्या बाबतीत तरी तंतोतंत लागू पडते.
मेट्रोसारखी महत्त्वाकांक्षी योजना तर शहराचे रुपडेच पालटते. केंद्र सरकारच्या सुधारित पावलामुळे ‘अच्छे दिन’ आले की नाही हा भाग चर्चेचा आणि कदाचित वाद – विवादाचाही असू शकतो पण, याबाबतीत मात्र, पिंपरी चिंचवड शहाराच्या विकासकामाची बदलाची गती लक्षणीय आहे, असे म्हणावयास निश्चितच वाव आहे. पूर्वनियोजित धोरण, योजना आदीबाबींमुळे सन २०२० सालाच्या आरंभापूर्वीच पिंपरी चिंचवड शहरात विकासाची गंगा अवतरित झाल्याचे चित्र आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात ग्रोथ इंजिन्सची भूमिका महत्वाची
शहरातील दळणवळण, प्रशस्त रस्ते, पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध विकास आदी बाबतीत पिंपरी चिंचवड शहराचा अनुभव काही विराळाच म्हणावा लागेल. शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेला स्मार्ट सिटी प्रकल्प, मेट्रो आदी योजनांचे परिणाम अजून दृश्य स्वरूपात दिसायचे सुरू होणे बाकी आहे. याशिवाय शहराच्या विकासाला सर्वाधिक गती देणारा विषय म्हणजे रिंगरोड, महामेट्रो, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली विकासकामे. आज राज्यातील मोठ्या विकासाच्या वाटेवरील सर्वाधिक विकासकामांचे केंद्रबिंदू म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख वाढते आहे. हे राज्यातील एकमेव शहर आहे, ज्या शहराला अनेक ग्रोथ इंजिन्स आहेत. आयटी, वैद्यकीय सुविधा, ऑटोमोबाईल, जैवतंत्रज्ञान या ग्रोथ इंजिन्समध्ये आता भर पडली आहे, ती कौशल्य विकसन केंद्रे, पर्यटन, सेवा उद्योग जगताची. औद्योगिक क्षेत्रामुळे रोजगारासाठी तरुणांची सर्वाधिक पसंती असणारे शहर म्हणूनही पिंपरी चिंचवड शहराकडे पहिले जाते. या सर्व गोष्टींमुळे शहरातील विकासकामांची गती अनेक पटींनी वाढलेली आहे.
आज शहरीकरण ही एक अपरिहार्य घडामोड झाली आहे. या बदलावर कोणाचेही नियंत्रण नाही. ही बाबदेखील तेवढीच सत्य आहे. इंडियन बँड इक्विटी फाउंडेशन च्या अभ्यासानुसार, राज्यात शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या २०१५ मध्ये ४३४ दशलक्ष होती. ती आता २०३१ पर्यंत ६०० दशलक्षापर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, व्यवसाय अशा विविध कारणांनी लोक खेड्यातून शहरी भागाकडे स्थलांतरित होताना दिसतात. ही शहरीकरणाची प्रक्रिया व त्याची उत्तरे आपल्याकडे आहेत का? याचे उत्तरं शोधायचे म्हटले तर, आज त्यावर काही पर्याय वा ती शोधण्याची मानसिकता दिसत नाही.
नजीकच्या काळात शहराच्या विकासाचा, वाढीचा विचार केला तर अनेक सर्वेक्षणामधून समोर आल्याप्रमाणे, पुरेशा पायाभूत सुविधासह सर्वांगीण विकास साधने हे एक मोठे आव्हान शहरातील राज्यकर्त्यांपुढे असणार आहे. डस्टिनेशन ही मोलाची भूमिका बजावणारं अनं गगनभेदी झेप घेणारं हे शहर त्यावरही नक्कीच उपाय शोधेल? अशी स्वतंत्र भारताच्या प्रजासकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अटकळ बांधून हा लेखप्रपंच इथेच थांबवितो.
– संपादक, न्यूज पीसीएमसी