न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२०) :- जगभरात वेगाने फैलावत असलेल्या करोना व्हायरससंबंधी योग्य माहिती मिळत नसल्यामुळे लोकांच्या मनात भिती आणि चिंतेने घर केले आहे. आवश्यकतेपेक्षा लोक जास्त काळजी घेत आहेत. साधा सर्दी, खोकला झाल्यास करोना तर झाला नाही ना? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. लोकांना पडणाऱ्या याच प्रश्नांसंबंधी दैनिक भास्करने एम्स भोपाळचे डायरेक्टर आणि सीईओ प्रोफेसर सरमन सिंह आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ रजनी कांत यांच्याशी संवाद साधला.
– सध्या तुम्ही जे कपडे घालून बाहेर पडता ते घरी आल्यानंतर रोज धुण्याची आवश्यकता आहे. घराबाहेर असताना काही वेळा तुमची इतरांबरोबर धडक होते. त्यावेळी कपडयांमार्फत तो संसर्ग तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तेच कपडे तुम्ही नाका-तोंडाजवळ नेले तर संक्रमित होण्याचा धोक अधिक जास्त असतो.
– चप्पल आणि बूटांमधून करोनाचा संसर्ग पसरत नाही. घडयाळ घालत असाल तर ते रोज स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. कारण ड्रॉपलेटसमधून घडयाळापर्यंत संसर्ग पोहोचू शकते.
– मोबाइल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपही रोज स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यामार्फतही करोनाचा संसर्ग फैलावू शकतो. करोनाची लागण झालेले रुग्ण तुमच्या आसपास असतील तरच हा संसर्ग या उपकरणांच्या माध्यमातून पसरु शकतो.
– प्रत्येकापासून दूर राहा. घरात असतानाही कुटुंबीयांपासून एक मीटरचे अंतर राखा.
– तुम्हाला सर्दी, खोकला झाला असेल तरच मास्क जरुर घाला. एन-९५ मास्क डॉक्टर, नर्सेससाठी आहे. प्रत्येकाने हे मास्क घालण्याची आवश्यकता नाही.
– सर्दी, खोकला आणि ताप आहे म्हणून तुम्हाला करोना व्हायरसची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही परदेश प्रवास केला असेल किंवा करोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर चाचणीची गरज आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला होणे स्वाभाविक आहे.
– करोना व्हायरसची लक्षणे पाच ते सात दिवसात दिसून येतात. काही वेळा १४ दिवसांचाही वेळ लागतो.