न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- १५ जून २०२० रोजी भारत चीन सीमेवरील गलवान येथे चीनी सैनिकांशी त्यांनी सीमेवर केलेल्या अतिक्रमणाविरोधात लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांबाबत आज पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केले आहेत.
दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले व शहीद कर्नल संतोष बाबू व इतर २० शहीद जवानांना स्तब्ध उभे राहून श्रद्धाजंली वाहण्यात आली.
या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “गलवान येथील घटने बाबत मोदींनी केलेल्या वक्तव्या बाबत नागरिकांच्या मनांत शंका व प्रश्न निर्माण झाले आहेत याबाबत मोदींनी देशाला उत्तरे द्यावीत,
सशस्त्र चीनी सैनिकांबरोबर लढताना आपले सैनिक नि:शस्त्र का होते?भारत सरकारने त्यांना शस्त्र पुरवली नव्हती का? गलवान खोऱ्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या २० शूर जवानांची चीनने हत्या केली. मग तरीही “आपल्या हद्दीमध्ये कोणीही घुसखोरी केली नाही” असं वक्तव्य करुन पंतप्रधान मोदींनी चीनला क्लिनचीट का दिली?आता गलवान खोरे भारतीय हद्दीत नाही का? गेल्या २ महिन्यांत पॅंगॉंग सरोवराच्या भागात चीनने बेकायदेशीररित्या कब्जा केला, तो आता भारतीय प्रदेशाचा भाग नाही का? जर गलवान आणि पॅंगॉंग भारतात नाही तर मग कुठे आहे? पंतप्रधान मोदींच्या खोटं बोलण्याचा वापर चीन आणि जागतिक माध्यमांनी गलवान आणि पॅंगॉंगच्या बेकायदेशीर कब्जाचे समर्थन करण्यासाठी केला. पंतप्रधान मोदींनी जनतेसमोर आलेच पाहिजे आणि भारतीय जनतेची माफी मागितली पाहिजे”
याप्रसंगी एन एस यू आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव, महेंद्र येरेल्लू, युनुस बागवान आदि पदाधिकारी उपस्थित होते.