न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- राज्यात यापुढे लॉकडाउन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केली आहे.
राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढते आहे त्याची चिंता जास्त आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
जुलै आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन आयसीयू बेड्स आणि डॉक्टर्स म्हणजेच आपले करोना योद्धे यांची संख्या वाढवत आहोत. एवढंच नाही तर राज्यातील करोना मृत्यू आम्ही लपवत नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. करोनाचा मृत्यूदर वाढणार नाही याचीही काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.