न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९०. ६६ टक्के लागला असुन, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
दिव्यांगामध्ये चिंचवड येथील कृष्णानगरमध्ये राहणारी सीमा बळीराम खराद या विद्यार्थिनीने बाजी मारली असुन, ८८ टक्के मार्क मिळवुन दिव्यांगामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
सीमा ही पुणे येथील फर्गुसन कॉलेजमध्ये शिकत होती. पुढे तीला पदवीधर होऊन युपीएससी च्या परीक्षेद्वारे समाजाची सेवा करायची आहे. तिच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.