न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शहरातील काही महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार असून, जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी कोरोनामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भात अद्याप कोणतीही स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी पसंती दिली जाऊ शकते.