न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२० आणि २१ हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे. ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण हे वर्ष सुरु केलं आहे.
प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.
कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.