- महापौर ढोरे यांनी वायसीएमच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- शहरामध्ये दररोज करोनामुळे मृत्यू होत आहेत. यामध्ये तरूणांचाही समावेश आहे. त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे. तरीही त्यांचा मृत्यू होत आहे. वायसीएममध्ये नेमक काम कसे सुरु आहे, याची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच एक बैठक घेऊन रुग्णालय प्रशासनाकडे खुलासा मागण्यात येणार असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.
माई ढोरे म्हणाल्या, शहरामध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जून महिन्यापासून मृतांची संख्याही वाढत आहे. आजपर्यंत शहरात करोनामुळे ३३५ मृत्यू झाले आहेत. यामध्ये अनेक २० ते ४० वर्ष वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. या तरुणांना दुसरा कोणताही आजार नाही. तसेच तरुणांची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. त्यामुळे त्यांनी या आजाराला सहज परतवणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही तरुणांचा मृत्यू कसा होतो याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
वायसीएम रुग्णालयातून अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. रुग्णालयात कशा पद्धतीने काम चालते याचे शूटींग करण्यात येणार आहे.
त्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. हे इंजेक्शन वापरण्यासाठी परवानगी देखील नाही. मात्र जीव वाचविणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारे उपचाराला प्राधान्य द्यावे. त्यासाठी खर्च करण्याची मर्यादापण आपण ठेवली नाही. त्यामुळे आयुक्तांनी इंजेक्शन बाबतही निर्णय घ्यावा, असे महापौर माई ढोरे म्हणाल्या.