- पालिकेच्या अण्णाभाऊ साठे ऑनलाईन प्रबोधन पर्व वेबिनार कार्यक्रमाचे उदघाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मिडीयाद्वारे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरक्षित अंतर ठेऊन कामकाज करायचे
आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज व्यक्त केले.
निगडी येथील सावरकर भवन येथे दिनांक १ ते ५ ऑगस्ट २०२० दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑनलाईन प्रबोधन पर्व वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, पदाधिकारी विशाल कसबे,सचिन पारवे, सुनील भिसे, गणेश खण्डाळे, संदीपान झोम्बाडे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरलमल, नाना सरोदे, माजी नगरसदस्य प्रल्हाद सुधारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या, महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य घराघरात पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे त्यामुळे या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अण्णाभाऊंचे विचार आपल्याला खूप उंचावर न्यायचे असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घरबसल्या होणार असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी.
पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या भाषणात कोरोनाचे सावट संपूर्ण देशात तसेच पिपरी चिंचवड शहरात देखील आहे. आणि आण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहत्सव पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आणाभाऊंचे विचार समजापर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ५ दिवसाच्या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आण्णाभाऊ साठे यांची जागतिक साहित्यिक म्हणून ओळख आहे. त्यांचे विचार या माध्यमातून घराघरात पोहचणार आहेत. त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.