- मग आम्ही काय घोडा मारला; कष्टकऱ्यांचा प्रशासनाला सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असल्याने जिल्ह्यातील कष्टकऱ्यांना मिळणारे तुटपुंजे उत्पन्नदेखील बंद झाले आहे. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधीनंतर आता पानटपरीचालक, चहा स्टॉलधारकांना व्यवसाय करु द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात कष्टकऱ्यांची उपासमार होत अनेक कष्टकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मद्यविक्रीची दुकाने, मॉल अशी संसर्ग पसरविणारे आस्थापने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मग आम्हालाही परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष मुन्नवर कुरेशी, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, जितेद्र जाधव, दीपक ओव्हाळ, गौतम ललकारे, विवेक लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.