न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यामध्ये आतापर्यंत केवळ त्या शहरात रहिवासी व्यक्तीलाच अर्ज करता येतो. परंतु, शासनाने आता राज्यातील कुठलाही व्यक्ती कोणत्याही शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करता येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्यावतीने सर्वांसाठी घरे (नागरी) योजना – प्रधानमंत्री आवास योजना मंजूर केली. सन २०१५ रोजी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, या योजनेसाठी अर्ज करू शकतो. परंतु, योजनेसाठी संबंधित लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे पती, पत्नी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे भारतात कोठेही पक्के घर नसले पाहिजे ही प्रमुख अट घातली आहे. यामुळेच एका राज्यातील व्यक्ती कोणत्याही शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५१ शहरे मंजूर केली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ५१ शहरांची निवड केली आहे. या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करणार आहे. यामध्ये १ ) बृहन्मुंबई , २ ) पुणे , ३ ) नागपूर , ४ ) पिंपरी – चिंचवड , ५ ) ठाणे , ६ ) नाशिक , ७ ) नवी मुंबई , ८ ) सोलापूर , ९ ) औरंगाबाद , १० ) कल्याण – डोंबिवली , ११ ) कोल्हापूर , १२ ) सांगली , १३ ) अमरावती , १४ ) मिरा भाईंदर , १५ ) उल्हासनगर , १६ ) भिवंडी , १७ ) अहमदनगर , १८ ) अकोला , १ ९ ) जळगाव , २० ) नांदेड वाघाळा , २१ ) धुळे , २२ ) मालेगाव , २३ ) वसई विरार , २४ ) लातूर , २५ ) परभणी , २६ ) चंद्रपूर , २७ ) इचलकरंजी , २८ ) जालना , २ ९ ) भुसावळ , ३0 ) पनवेल , ३१ ) सातारा , ३२ ) बीड , ३३ ) यवतमाळ , ३४ ) गोंदिया , ३५ ) बार्शी , ३६ ) अचलपूर , ३७ ) उस्मानाबाद , ३८ ) नंदूरबार , ३ ९ ) वर्धा , ४0 ) उदगीर , ४१ ) हिंगणघाट , ४२ ) अंबरनाथ , ४३ ) बदलापूर , ४४ ) बुलडाणा , ४५ ) गडचिरोली , ४६ ) वाशिम , ४७ ) भंडारा , ४८ ) हिंगोली , ४ ९ ) रत्नागिरी , ५0 ) अलिबाग , ५१ ) सावंतवाडी , जि . सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.