- शहर मनसेची पालिकेच्या ‘ह’ प्रभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- दापोडीतील गणेशनगर व पुणे मुंबई महामार्गाला जोडणारा भाई कोतवाल उड्डाणपुलास वळण घेणाऱ्या सेवा रस्त्यांवरील डांबर गायब झाले असून, त्यामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा बनला आहे. रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे, अशी मागणी शहर मनसेने पालिकेच्या ‘ह’ प्रभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मार्गावर चढ व उतार असल्यामुळे वाहनचालकांना वाहनाचा वेग आवरता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक लहान मोठे अपघात होत आहेत.
पालिकेने या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी मनसे उपविभाग अध्यक्ष अलेक्स अप्पा मोझेस यांनी केली आहे. निवेदन देताना दिलीप ठोंबरे, वॉर्ड अध्यक्ष सागर भोकरे, सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, प्रशांत सांगळे, मनसैनिक सतीश मात्मार्थी, पंकज ओव्हाळ आदी उपस्थित होते.