- पुणे-दिल्ली किसान ज्योत यात्रेचे निगडीत स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२१) :- दिल्ली येथे अनेक दिवसांपासून देशातील शेतकरी तीव्र आंदोलन करत आहेत. अनेक बैठका झाल्या केवळ निष्फळ चर्चाच केंद्र सरकार करत आहे. यावर तोडगा निघत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही कृषी कायदे रद्द करा अन्यथा आम्ही रद्द करू असा इशारा दिला आहे. आता केंद्रानं अंत पाहू नये, अन्यथा देशात उद्रेक होऊ शकतो, असे मत कष्टकरी नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
तीन कृषी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्ली किसान ज्योत २६ जानेवरीच्या दिल्ली किसान प्रजासत्ताक मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी फुलेवाडा, पुणे येथून युवराज गटकळ, प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शनात यात्रेचा प्रारंभ झाला. तरुणांच्या या उत्साहाला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देवून यात्रेचे स्वागत पिंपरी चिंचवड शहरात निगडी येथे कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने केले.
यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, प्रहारचे शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, संदीप जाधव, हौसराव शिंदे, मधुकर वाघ, माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, सुनंदा चिखले, राजेश माने, उमेश डोर्ले, काशीम तांबोळी, प्रकाश साळवे, नितीन भराते, अंबालाल सुकवांल, सुरज देशमाने, ओम प्रकाश मोरया, संजय साळुंखे, संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.
नखाते म्हणाले “केंद्रीय कामगार व इतर संघटना आणि स्वतंत्र संयुक्तमंच यांचेकडून हे राक्षसी कृषी कायदे आणि अजूनही कायद्यात रुपांतर न झालेले वीज विधेयक रद्द करणे आणि सर्व पिकांना किमान आधारभूत भावाची कायदेशीर हमी देऊन त्यांच्या शासकीय खरेदीची यंत्रणा उभी करणे या बाबतीत केंद्र सरकार दाखवत असलेल्या सरासर नकारात्मक आणि अहंकारी वृत्तीचा धिक्कार करीत आहे. लढा देत असलेले शेतकरी व त्यांच्या संघटनांवर, मिडिया आणि पगारी ट्रोल टोळीच्या मदतीने, खलिस्तानी, दहशतवादी असल्याचा शिक्का मारून बदनाम केले जात आहे.