- उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले गेल्याने रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे.
त्यामुळे जलउपसा कमी झाल्याने संपूर्ण शहरातील आज दिनांक ७ एप्रिल तसेच उद्या दिनांक ८ एप्रिल रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील.
याबाबत, जल संपदा विभागाशी समन्वय साधण्यात आला असून पाणी पुरवठा लवकरात लवकर पुर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.