न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसासह काही भागांत गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शुक्रवारी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पावसाळी स्थितीमुळे राज्यातील तापमानात सध्या घट नोंदविली जात आहे.