- १० वी व ११ वीच्या गुणांना आले महत्व…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- बारावीच्या निकालाचे मुल्यमापन करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. २०१९ मधील विषयनिहाय लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिकाचे अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारीत करण्यात आले आहे. यात मिळाले गुण कायम ठेवण्यात येतील, असे शासनाने म्हटले आहे. शासनाने यासाठी ३०:३०:४० असा फॉर्म्युला ठरवला आहे.
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेतील गुण, अकरावीच्या अंतिम परीक्षेतील गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार ठरवले जातील.
परीक्षेसाठी निर्धारीत एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील, ३० टक्के गुण अकरावीच्या परिक्षेतील, तसेच ४० टक्के गुण बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील असतील.