- संविधानामुळेच विविधतेत एकता नांदली जाते – व्या. डॉ. राजेंद्र कांकरिया..
- चिंचवडच्या प्रतिभा कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- संविधान दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संविधान दिन सोहळा साजरा करण्यात आला.
कमला एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन कार्यक्रम, संविधान प्रास्ताविक वाचन, विविध राज्यातील पारंपारिक वेशभुषा परिधार करून विविधतेतून एकतेचा संदेश, व्याख्यान आदी कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्हाडे, प्रा. अमेय देशपांडे, व्याख्याते ओंकार आण्णेगिरीकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद बोरगे, प्रा. अश्लेषा देवळे, डॉ. आनंद लुंकड आदी उपस्थित होते.
अभ्यासक प्रा. अमेय देशपांडे म्हणाले, युवा पिढीने भविष्यात योग्य दिशेने सत्याच्या बाजूने जाण्यासाठी संविधानाचा सखोल अभ्यास करावा. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे. चूकीची गोष्ट निर्माण करण्यासाठी वेळ लागत नाही तसेच, जाणून घेणे प्रत्येकांचे कर्तव्य असले तरी सत्याचीच कास प्रत्येकाने अंगिकारावी, दावित्वाची भावना देशाप्रती निर्माण करावी असे आवाहन केले.
व्याख्याते डॉ. राजेंद्र कांकरीया म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या संविधानाला ७० वर्षे पूर्ण होत असताना ७१ व्या वर्षात आज पदार्पण करीत आहोत. आपण भारताचे नागरिक आपल्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहोत. लोकतांत्रिक व्यवस्था अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी आज प्रतिज्ञाबद्ध होवूयात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या घटना अभ्यासून संविधानाच्या निर्मितीसाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच आज देशात अनेक भाषा, परंपरा, धर्म, संस्कृती संविधानामुळे एकत्रित नांदली जात आहे.
राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. अरविंद बोरगे यांनी केली. त्यात १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थी हरीश पाटील, पूजा काळे, ओंकार मांडगे, पूनम बार्वे, शुभम घार्गे, तनाय सुतार आदींनी मनोगत व्यक्त केले, आभार प्रा. आश्लेषा देवळे यांनी मानले.