- संत तुकराम अनं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२२) :- २ वर्षाच्या खंडानंतर आषाढी एकादशी दिवशी पायी वारी पंढरपूरला जाणार आहे. यंदा १० जुलैच्या दिवशी पार पडणार्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी २० जूनला देहूमधून संत तुकाराम महाराजांची आणि २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे.
यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होणार आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे.
तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान – २० जून रोजी होईल. यात पहिलं गोल रिंगण – ३० जून (बेलवंडी), दुसरं गोल रिंगण – २ जुलै, (इंदापूर), तिसरं गोल रिंगण – ५ जुलै (अकलूज माने विद्यालय), पहिलं उभं रिंगण – ६ जुलै (माळीनगर), दुसरं उभं रिंगण – ८ जुलै (बाजीराव विहीर), तिसरं उभं रिंगण – ९ जुलै (पादुका आरती)
यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने पायी वारीसाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकर्यांमध्ये उत्साह आला आहे. अनेक जण आता तयारीला देखील लागले आहेत.