न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- ताथवडे येथे संत साहित्याच्या अभ्यासक गं भा प्रमिला पाटील यांच्या अमृतमहोत्सवी पंच्याहत्तरी निमित्त नागरी सन्मान सोहळा आयोजित केला होता.
यावेळी गं भा प्रमिला पाटील म्हणाल्या, “एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सूरु आहे. प्रत्येकालाच पुढे जायचे आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. अश्या धकाधकीच्या काळात संत साहित्य या पिढीला नक्कीच योग्य दिशा देण्याचे कार्य करेल यात शंका नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात माझा हा पंचाहत्तरीचा कार्यक्रम आपण आयोजित केला याचा आनंद होत आहे. आपले राज्य आणि देश वेगाने प्रगती करत आहे. त्यासाठी भविष्यात तुमचा मोलाचा सहभाग असणार यात शंका नाही एकमेकांमध्ये “द्वेष निर्मिती” होण्यापेक्षा “स्वनिर्मिती”करण्याकडे युवावर्गाने ध्यान केंद्रित केले पाहिजे.”
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती कॅम्प एज्युकेशन शाळेचे उप प्राचार्य प्रमोद पाटील, डॉ. राजेश पाटील, वंदना पाटील, राजेंद्र बहिरट, डॉ. भोईटे, प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे विजय मुनोत, अर्चना घाळी, अँड विद्या शिंदे, संतोष चव्हाण, विजया आहेरराव, दिलीप साळुंखे, किशोर पाटील, सुरेश पाटील, दिपक पाटील, विजय शिंदे, योगेश पवार, पंकज मुळे, शोभा पाटील, बाबासाहेब घाळी, अंकुश माने, रविंद्र कांगुडे, सचिन इंगवले, सचिन कदम, ललित शिंगवी, सुजित पानसे, अमोल हेळवर, रवि हेळवर, एकनाथ माळी, सुभाष मुळे, प्राध्यापिका ओझर्डे, मच्छिन्द्रनाथ राजे, बिपिन पवार, अमोल पाटील, यश गायकवाड, जयप्रकाश शिंदे यांची होती.
कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन ओंकार पाटील, अध्यापिका रुपाली पाटील, सोनाली मुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनिता पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले.