न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२२) :- चिखली, साने चौक, मोरे वस्ती येथील पाणी प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी हंडा मोर्चा काढण्यात आला.
शिवसेनेचे नेताजी काशीद आणि रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात धनंजय आल्हाट, राहुल भोसले, नीलेश मुटके, आशा भालेकर, जनाबाई गोरे, कल्पना शेटे आदी सहभागी झाले होते.
डोक्यावर हंडा घेऊन महिला व शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. टॉवर लाईन ते साने चौक असा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात भाजप व महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने क्षेत्रीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच, पाणी समस्या दूर न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.