छत्रपती शिवरायांचे चारित्र्य स्वच्छ व तेजस्वी – अरुण चाबुकस्वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उद्योजक योगेश तुड्येकर, शांतीलाल गोगरी , सामाजिक कार्यकर्ते बी .एस .कांबळे, सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. एंजेल परिहार ,रिया परमार , तसेच इयत्ता ८ वी चे विद्यार्थी तन्मय इंगळे ,आमी लखानी व इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी संस्कृती यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यशश्री कुटे , तनुष्का कांबळे यांनी पोवाडा सादर केला.
“प्रज्ञा, शील, करुणा चैतन्य, शूरत्व, स्वाभिमान, संयम, समयसूचकता अशा निपूण केले. शिवरायांचे चारित्र्य स्वच्छ आणि तेजस्वी होते. त्यामुळेच राजांबद्दल शत्रूना व त्यांच्या स्त्रियांना देखील आदर वाटायचा. सध्या शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य होय. राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत. हे जगात प्रथम शिवरायांनी मांडले व अमलात आणले. त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीला हि इजा पोहचविणाऱ्या राज्यसेवाकास सजा होत असे. जगातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शिवचरीत्रात सापडते, म्हणून ‘शिवचरित्र’ हे वर्तमानात सर्वासाठीच प्रेरणादायी आहे.”असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी उद्गार काढले.
वैष्णवी गवळी व ममता मंगलो यांनी सूत्रसंचालन केले. हर्षिता सोळंकी हिने आभार मानले.