न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- शहरात आरटीईअंतर्गत ३४६४ जागा आहेत. सद्य:स्थितीत यापैकी २४७० जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, ९९४ जागा अद्यापही रिक्त आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची सुनावणी सुरू आहे.
परिणामी अद्यापही प्राधान्यफेरी सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. प्रवेश रद्द केलेल्यांची सुनावणी करण्यात येणार आहे. यंदा १३८ अर्ज कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणांमुळे रद्द केलेले आहेत. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देऊनहीं प्रवेश कमी झाल्याचे दिसून येत आहे.
प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या ६५६ जणांशी संपर्क झालेला नाही. शाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा काळ झाला आहे. परंतु अद्यापही आरटीईची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापही प्रवेश झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.