न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज रोजी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट घेतली. यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली व संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थीतीबाबत अडचणी कथन केल्या.
यावेळी ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यानी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी राज्यपाल यांना सांगितल्या.
मकरंद कुलकर्णी यांनी राज्य सरकारशी आज पर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थीती कथन केली. तसेच ॲड आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या सरक्षंणसाठी कडक कायदे करावे अशी मागणी केली. असेहि त्या म्हणाले
यावेळी राज्यपालांनी सगळ्या अडचणी ऐकून घेउन, सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले.