न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यानी राष्ट्रवादीला लक्ष करीत अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले की, राष्ट्रवादीकडून आमच्यावर अन्याय होत आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेले भूमिपूजन राष्ट्रवादीच्या लोकांकडून थांबवले जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर क्षुल्लक कारणांसाठी गंभीर गुन्हे दाखल झाले.
खेडचे आमदार दिलीप मोहिते हे आणि माजी आमदार सुरेश गोरे यांनी केलेली कामे थांबवत आहेत. या साऱ्या बाबी आम्ही पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या आहेत. ते आम्हाला चांगले बळ देतील, अशी अपेक्षा आठळराव यांनी व्यक्त केली. सरकार आमचे आहे असे म्हणायच आणि आम्हीच अन्याय सहन करायचा. राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आम्ही पक्षप्रमखासोबत आम्ही चर्चा देखील केली आहे. त्यांची बाजू आम्ही समजून घेऊ शकतो. कारण सरकारला आताच कुठे १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आम्ही काही दिवस प्रतिक्षा करू, असे त्यांनी सांगितले.