- राज्याच्या हवामान विभागाचा अंदाज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- कनार्टक किनारपट्टीपासून ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. ८ व ९ जानेवारी रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.