न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
याची दखल घेत, पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली भागातील सुमारे ७०० कुटुंबाना अन्न धान्य व गृह्पोयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवडचा राजा या चिंचवडमधील मंडळाचे देखील सहकार्य होते, अशी माहिती उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी दिली.