न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- दिवाळीच्या आधी शाळा सुरु करणे अशक्य आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात म्हटलं आहे. काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आणि त्यानंतर त्याचे परिणामही भोगले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं की करोनासारखा रोग येणार आहे आणि सगळ्यांना घरात बसावं लागेल तर कुणाचा विश्वास बसला नसता. हे संकट ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन घोषित केला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
केरळमध्येही करोनाचा प्रादुर्भाव होता पण त्यांनी तो आटोक्यात आणला. आता पुण्यातही करोना आटोक्यात आला पाहिजे ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.