न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे विभागातून २५ मे पर्यत १२८ रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेशसाठी १५, उत्तरप्रदेशसाठी ५६, उत्तराखंडसाठी २, तमिळनाडूसाठी २, राजस्थानसाठी ५, बिहारसाठी ३३, हिमाचल प्रदेशसाठी १, झारखंडसाठी ६, छत्तीसगडसाठी ४, जम्मू-कश्मीरसाठी १, मणीपूरसाठी १, आसामसाठी १ व ओरीसासाठी १ अशा एकूण १२८ रेल्वे रवाना झाल्या असून, यामधून १ लाख ६९ हजार ८२४ प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगीतले.
दिनांक २६ मे रोजी पुणे विभागातून १२ रेल्वे रवाना होणार असून यामधून १६ हजार ८०० व्यक्ती त्यांच्या राज्यात पोहचतील. या व्यतिरिक्त ६ हजार ७६९ बसेसव्दारे १ लाख ३ हजार २८७ व्यक्तींना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर व जिल्हयांमध्ये पोहचवण्यात आले आहे. वेगवेगळया भागातून पुणे विभागात एकंदर ३३९ बसेसव्दारे ७ हजार ८० व्यक्ती आल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.