- राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. ऑगस्ट. २०२०) :- “राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
“राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून, ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत,” असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते भाजपात नाराज असल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.