- पिंपळे सौदागर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२२) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिवर्तन घडविण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले असून या थोर महापुरुषाच्या विचार आणि कार्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळाली, असे प्रतिपादन भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षा तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी केले.
पिंपळे सौदागर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त तक्षशिला सेवा संस्था व विराज जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी कुंदाताई भिसे बोलत होत्या. याप्रसंगी कुंदाताई भिसे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक संजय तात्याबा भिसे यांनी परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रलय जगताप, दिगंबर जगताप, कुणाल जगताप, आकाश जगताप व विवेक भिसे उपस्थित होते.
कुंदाताई पुढे बोलताना म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून परखड भुमिका घेतली. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक परिवर्तन झाल्याने समाजात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांचे आचार विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आपले योगदान देणा-या या थोर महापुरुषाच्या विचारांचे पालन आपण किती करतो याचे प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. चांगली पिढी घडविण्यासाठी या महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.