- शहरातील २८ विद्यार्थी जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीसाठी ठरले पात्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- आर्थिक दुर्बल घटकातील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) राज्य परीक्षा परिषदेने घेतली होती. तिचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून त्यात शहरातील २८ विद्यार्थी जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना दरमहा एक हजार व वार्षिक १२ हजार रुपये पाच वर्षांसाठी मिळणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी ते विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षा २००७-०८ पासून घेतली जात आहे. आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे, उच्च माध्यमिक स्तरापर्यंत त्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करणे, त्यांची शाळेतील गळती रोखणे यासाठी ही योजनेची उदिष्टे आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीची संख्या एक लाख असून महाराष्ट्राचा कोटा १९ हजार ६८२ आहे. त्यातील संवर्ग आरक्षणानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी निश्चित करून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र ठरवले जातात.
पात्र ठरलेले विद्यार्थी…
मंगेश भटणे, रोहन शेप, दीक्षा मुंडे, आदर्श पाटील, ममता इंगोले, गौतमी गायकवाड, आदिती लोखंडे, किरण पाटील, अभिषेक थोरात, गायत्री पवार, प्रांजल खरात, साक्षी शेंडगे, सुयश निंबाळकर, जिया कंक (सर्व सयाजीनाथ विद्यालय); मृणाल बागूल, अवेज शेख, प्रगती धावरे (भैरवनाथ विद्यालय); यश शिंदे (जाधववाडी मुलांची शाळा), साक्षी गरड (जाधववाडी मुलींची शाळा); पायल पाटील, वैष्णवी फंड (जिजामाता विद्यालय); प्रगती कांबळे, प्रतिक्षा कांबळे (दिघी मुलींची शाळा); नीशा सुरवाडे (सुबोध विद्यालय); अनुष्का कांबळे (संत ज्ञानेश्वर विद्यालय), शुभम शेंबादे (बारासे स्कूल); अथर्व काळे (जय हिंद स्कूल); सानिका पाटोळे (सरस्वती विद्यालय) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.