- आयुक्तांनी नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांची काळजी करावी – छाया सोळंके-जगदाळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहीजणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. नागरीकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांची देखील काळजी घेणे हे देखील जबादारी आयुक्त यांचीच आहे. पण तसे होताना दिसत नाही. म्हणून राज्य शासनाने कोवीड १९ चे काम करत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत किंवा त्यांचे कामाचे तास दिवस ठरवले आहेत. त्या नियमाचे तंतोतंत पालन करावे अशी मागणी मराठी एकीकरण विकास आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष छाया सोळंके-जगदाळे यांनी केली आहे. या मागणीचे पालिका कर्मचारी वर्गाने देखील समर्थन केले आहे.
कोरोना विषाणुचा विळखा आता दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरात देखील वाढू लागला आहे. यामध्ये अंदाजे तीनशेच्या जवळपास लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. आज शहरातील तीस लाख लोकांच्या आरोग्याबरोबरच इतरही कामाची जबादारी ज्या कर्मचाऱ्यावर आहे त्यांचे आरोग्यदेखील सुरक्षित राहवे यासाठी प्रयत्न करणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. कर्मचारी सुरक्षित असतील तरच शहराती अनेक नागरीकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास याच कर्मचारी वर्गाची मदत होणार आहे. पण आयुक्त यांच्याकडून याच कर्मचारी वर्गाबाबत दुजाभाव होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना थोडीही विश्रांती न देता सतत कामाला जुंपणे, ठरावीक कर्मचाऱ्यांनाच एका पेक्षा जास्त काम देणे. अशा अनेक कामामुळेच कर्माचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ व शारिरीक आरोग्य ढासाळले असून अनेकांना कोरोनाची लागण होऊन काहीजनांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. यामुळे कर्मचारी वर्गात देखील मोठा असंतोष पसरला आहे. या सर्वांचा उद्रेक होण्याआधिच आयुक्तांनी याबाबत योग्य ते नियोजन करावे. अन्यथा अजून एका वेगळ्या समस्याला तोंड दयावे लागले तर नवल वाटणार नाही.
कोविड नियमावलीकडे दुर्लक्ष…
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमानेच एकदिवसाआड कामावर बोलवावे. ज्या कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या विशिष्ट कामकाजासाठी नियुक्ती केली असेल तर चौदा दिवसांनी त्यांना विश्रांती देऊन काही कालवधीनंतर त्यांची पुन्हा कामावर नियुक्ती करावी. असाही नियमात स्पष्ट उल्लेख असताना या नियमाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांची देखील वेळच्यावेळी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. त्यांना कोरोनापासून बचाव करणारी साहित्य व साधने पुरवावे अशा अनेक नियमांचा देखील स्पष्ट उल्लेख असताना या सर्वच नियमाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कर्मचारी हा महापालिकेचा कणा समजला जातो. हाच कणा मोडून पडला तर संपुर्ण शहरातील कोरोना यंत्रणा कोलमडून पडेल.
प्रोत्साहन भत्ता मिळावा…
आज अनेक कर्मचारी दैनंदिन वेळेपेक्षा जास्त वेळ काम करत आहेत. तसेच सुट्टीच्या दिवशी देखील कामावर येत आहेत. यामध्ये आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तर अनेक लिपीक वर्गालाही या कामावर जुंपले असून त्यांच्यावर देखील मुळ कामाबरोबरच या कोवीड १९ च्या कामाची देखील जबाबदारी दिली आहे. अशा वेळी शाररीक व मानसिक संतुलन बिघडून हा वर्ग आपले योगदान देत आहे. अशा वर्गाला व कोवीडसाठी काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना प्रोत्सहान भत्तादेखील देण्यात यावा, अशी मागणीसुध्दा छाया सोळंके-जगदाळे यांनी केली आहे.