न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- तिसऱ्या टप्यात समावेश होऊनही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी योजनेचा वेग चांगला राहिल्याने विकास कामांच्या आधारावर शहराला राज्यात चौथे तर देशात ४१ वे स्थान मिळाले आहे. देशात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधानानी स्मार्ट सिटी योजना सुरू केली होती. गुणवत्ता असूनही राजकारण झाल्याने योजनेतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात डावलले गेले होते.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या टप्यात शहराचा समावेश करण्यात आला. किती निविदा काढल्या, कार्यारंभ आदेश किती दिले, प्रकल्प पूर्ण किती झाले, यावरून गुणांकन काढले आहे. यापूर्वी शहराचा गुणांक देशात कमी झाला होता. याचे प्रमुख कारण तिसऱ्या टप्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला होता. त्यामुळे कामे उशिरा सुरू झाली. तरीसुद्धा देशात सुधार असूनही ४१ व्या क्रमांकावर आले आहे.
निविदे प्रक्रियेपासून स्मार्ट सिटी पालिकेत प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंतचा निविदा भरल्यानंतर आढावा घेत गुणांकनाद्वारे स्थान निश्चिती केली आहे. या पूर्वी देशात ४९ वा क्रमांक होता. त्यात सुधारणा झाली असून ४१ व्या क्रमांकावर शहराने झेप घेतली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत पिंपरी – चिंचवड राज्यात चौथे आहे. विकास कामाचा वेग आणि पूर्णत्व यास केंद्राकडून गुणांकन असते, स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प अंतिम टप्यात आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण होतील आणि आणखी गुणांकन सुधारेल. देशात गुणांकन सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.