न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल आणि दिल्लीतून निधी आणून आपल्याला मतदार संघाचा विकास करेल. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय. विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात पण ते विसरून जातात की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात. जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत. मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत. पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे. पर्यटन म्हणून अनेक प्रकारे निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो, असं प्रतिपादन महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
जुन्नर गावभेट दौऱ्या दरम्यान पिंपळगाव सिद्धनाथ येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. गावातील पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून औक्षण करून आत्मियतेने स्वागत केले. बैलगाडीतून रॅली काढण्यात आली. जेसीबी तून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव करण्यात आला. श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख भाजपा संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, पिंपळगाव सरपंच विक्रम खंडागळे, उपसरपंच उज्वलाताई खंडागळे, गोळेगाव सरपंच सुनीताताई मोदे, उपसरपंच हर्षल जाधव, कुमशेत सरपंच रवीशेठ डोके, उपसरपंच निर्मलाताई डोके, अलदरे सरपंच सविताताई सरजने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते
गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ, गोद्रे व कुमशेत आधी गावाचे शेतकरी बंधू ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
अतुल बेनके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून आपण प्रचार दौरा सुरू केला याचा अभिमान आहे. विद्यमान खासदार यांच्या जनतेबद्दल बिलकुल तळमळ नव्हती, जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे. शाश्वतीने काम करणारा व्यक्ती पाहिजे. ते व्यक्ती आहे शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्या तालुक्याला दादांची गरज आहे. धरणातील पाणी नदीला कमी पडू देणार नाही असा शब्द देतो.
आशाताई बुचके म्हणाल्या, देशामध्ये मोदी जी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादा आपल्याला आपल्यासमोर आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही नटरंगला निवडून दिले होते. प्रत्येकाला ठाऊक आहे गल्लीत काम करणार की दिल्लीत गर्जनारा प्रतिनिधी महत्त्वाचा असतो. प्रत्येकाने पेटून उठा आणि दाखवून द्या. हे मतदारसंघ म्हणजे एक घर आहे आणि ते सांभाळणे हे शिवाजीराव दादाराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही.
संतोष खंडागळे म्हणाले, विद्यमान खासदारांना अशी गावे माहीत आहे का ? शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रत्येक वाडी वस्तीचा अभ्यास आहे. आणि त्यांनी त्या गावांना मदतही केली आहे. अनेक प्रकल्प मार्गी लावले. डोंगरी विभाग असलेला हा मतदारसंघाचे अनेक प्रश्न मांडले. पाणी आणि विजेची काम मार्गी लावले शेतकऱ्यांचा पोटचा तळमळीचा असणारा खासदार असणारे दादांना निवडून द्या.