- वीजबिलावरून देवेंद्र फडणवीसांचे पदवीधरांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- कोविड महामारीत नागरिकांना भरमसाठ नागरिकांना वीजबिलं आली. आम्ही पहिल्यांदा आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील बिलं जमा केली. दोन खोल्यात राहणाऱ्यांना तीस हजारांचा बिल आलं. सरकारला ती बिलं दाखवली. उभ्या महाराष्ट्रात न वापरलेल्या विजेची बिल तुम्ही नागरिकांना देता, त्यावर मंत्र्यांनी बिल सुधारून देऊ आणि बिलात सवलत देखील देण्याचं आश्वासन दिल. मात्र, आता या सरकारने यु टर्न घेतला. ज्या सरकारने विजेचा शॉक दिला त्या सरकारला मतांचा शॉक देऊन त्यांना जाग करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे,” असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.
ते पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात चिंचवड येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “त्यानंतर काही कालावधी निघून गेला. वीज बिल सवलत मिळणार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं. मग, सात दिवसानंतर राज्याचे ऊर्जामंत्री म्हणाले वीज वापरली तर पैसे भरावे लागतील. कोणाला एक पैशांची सवलत मिळणार नाही असं सांगतात. त्यानंतर ऊर्जा मंत्री म्हणतात, ज्यावेळी घोषणा केली तेव्हा माझा अभ्यासच झाला नव्हता. हे कुठला अभ्यास करतात हे मला देखील समजत नाही. आता म्हणतात कुठल्याही प्रकारची सूट देता येणार नाही.