- शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्याकडून भाजपवर मिश्कील टिपण्णी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी राजशिष्टाचार मोडीत काढत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनात राजशिष्टाचार पाळला जात नाही. याबाबत शिवसेनेने टीका केली आहे.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने मनमानी पद्धतीने कामे केली जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राजशिष्टाचार असतो, त्याचे पालन भाजपची सत्ता आल्यापासून केले जात नाही. श्रेयवाद करण्यासाठी राजकारण केले जात आहे.
वाकड मधील विकासकामे उदघाटन करण्यासाठी महापौर यांना पत्र दिले आहे. मात्र, महापौर राज्य सरकारमधीलमंत्र्याना निमंत्रण पत्र देत नाहीत. राजशिष्टाचार पुण्याच्या महापौरांना कळतो. आपल्या महापौरांना कळत नाही. राजशिष्टाचाराचे उल्लंघन करुन स्वत:च आंदोलन करणे ही बाब हास्यास्पद आहे.