- ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याच गावात शिवसेनेकडून सुरुंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जानेवारी २०२१) :- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे सोडून कोल्हापूरला जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची मागणी करत आहेत. आता ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याच गावात शिवसेनेने सुरुंग लावला आहे.
गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनाप्रणित पॅनेलने ९ पैकी सहा जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला आहे. तर काँग्रेसला एक व भाजपाला दोन जागा मिळाल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे खानापूरमध्ये भाजपाप्रणित पॅनेलची सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे.