- आजचा विद्यार्थी भविष्यात आदर्श नागरीक कसा घडेल यासाठी प्रयत्नशिल – डॉ. दीपक शहा..
- प्रतिभा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२१) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात सरकारी सुचनांचे काटेकोर पालन करीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहन उद्योजक व एमजेएफ लायन मनोज बंन्सल यांच्याहस्ते करण्यात आला.
त्यावेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, शिक्षणशास्त्र विभागाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे, डॉ. जयश्री मुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस समवेत शिक्षक, प्राध्यापक, पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी उद्योजक श्री. बंन्सल व सचिव डॉ. दीपक शहा यांच्याहस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थी व पीएचडी मिळविलेल्या प्राध्यापकांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
उद्योजक मनोज बंन्सल पुढे म्हणाले, स्पर्धेच्या युगात संधी अभावी विद्यार्थ्यांनी नाउमेद होता कामा नये. प्राध्यापकांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनातील प्रतिभा हेरून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, आज शिक्षण क्षेत्राचा विस्तार होत असून या महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्यासंख्येने त्यांच्या आवडत्या विषयात संशोधन करून पीएचडी पदवी ग्रहण करीत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्रास्ताविकात म्हणाले, आज कोरोना प्रादुर्भावामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी उपस्थित नसले तरी त्याचे पालक उपस्थित राहीले आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचार्यांनी गेल्या काही वर्षात आपलेपणाच्या भावनेतून अविरत कष्ट केल्यामुळेच संस्थेची गुणात्मक श्रेणी दिवसेंदिवस जनमाणसात व शैक्षणिक क्षेत्रात वाढत असून संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. आज संस्था फक्त पिंपरी-चिंचवड शहरापुरतीच मर्यादित राहिली नसून विविध अभ्यासक्रमासाठी जालना, कोल्हापूर आदी भागातील विद्यार्थ्यांनी देखील या संस्थेत विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कौटुंबिक वातावरणात कर्तृत्ववान विद्यार्थी कसा घडेल व येणार्या काळात एक आदर्श नागरीक कसा घडेल यासाठी प्रयत्नशिल रहावे. असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्र निरगुडे यांनी तर, पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना गांगल यांनी तर आभार डॉ. सुनिता पटनायक यांनी मानले.