- जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- क्रांतीसिंह नाना पाटील हे थोर स्वातंत्र्यसैनिक, प्रभावी वक्ते आणि झुंजार नेते होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुध्द पत्री सरकारची स्थापना केली होती आणि आक्रमक पवित्रा घेऊन त्यांनी इंग्रजी सत्तेला विरोध केला होता अशा देशभक्तांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीमधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या क्रांतीसिंह नाना पाटील हे स्वत: प्रखर देशभक्त तर होतेच शिवाय देशवासीयांनी स्वयंपूर्ण बनावे यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे त्यांच्या देशभक्तीचा आदर्श भावी पिढीने जोपासावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.