- यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- चिखली संभाजीनगर येथील साईअॅक्वा मरीन जलतरण तलावात (दि. १६) रोजी दुपारी ४.०० च्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ हा पोहण्यासाठी गेला होता.
दरम्यान तेथील यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे फिर्यादीच्या चुलत भावाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला तेथील जिवरक्षक व जलतरण तलावावर नियंत्रण ठेवनाऱ्या इतर जबाबदार व्यक्ती कारणीभूत आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी सुरज मलिक्काअर्जुन वाघमोडे यांनी आरोपींच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात ३२४/२०२३ भादवी कलम ३०४(अ).३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.