न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :- निगडी, यमुनानगर कॉर्नर येथील कै. मिनाताई ठाकरे जलतरण तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. पाणी फिल्टर करून हा जलतरण तलाव सुरू करण्यात यावा.
तसेच आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार उद्भवू लागले आहेत. त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात यावी. शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सुटीचे दिवस असूनही पोहण्याचा सराव करता येत नाही.
त्यामळे हा जलतरण तलाव लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.