न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभेसाठी महायुतीकडून खा. श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. २२) उमेदवारी अर्ज भरला. या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दहावी पास असल्याचा उल्लेख केला आहे. तब्बल ४२ वर्षांनंतर परीक्षा दिल्यानंतर ते दहावी उत्तीर्ण झाले आहेत.
तर २०१४ आणि २०१९ ला दाखल केलेल्या अर्जावर बारणे यांनी दहावी नापास असा उल्लेख केला होता. १९८० मध्ये नापास झालेले श्रीरंग बारणे हे २०२२ ला उत्तीर्ण झाले आहेत.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बारणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख केला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आठवी पास आणि दहावी नापास असा उल्लेख केला होता.
श्रीरंग बारणे यांनी २०१४ आणि २०१९ च्या शपथपत्रात आठवी पास-दहावी नापास असल्याचे लिहून दिले होते. त्यात चिचवड येथील फत्तेचंद शाळेतून १९८० मध्ये नापास झाल्याचे नमूद केलेले आहे. त्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी त्यांनी २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत.