न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०४. जुलै. २०२०) :- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून काही महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा झालेल्या नाहीत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची मते तसेच त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी महापालिकेची सभा, विषय समिती सभा विनाविलंब घेण्याची मागणी विविधि राजकीय पक्षांनी राज्य सरकारकडे केली.
राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी एकच आदेश पारित केला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या विहीत सभा, बैठका घेणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर पाळत नियतकालिक सभा घेतल्या जाव्यात. या पुढील सभा – बैठका व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे नियमितपणे घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी शुक्रवार (दि. ३) रोजी दिले आहेत.