न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. नोव्हेंबर २०२०) :- किवळे येथे वळईला आग लागून जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकरी दत्तात्रय गणपत कोंडेकर यांचे सुमारे २५ हजार रुपायांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करुन भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
किवळे येथील शेतकरी कोंडेकर यांनी दुभत्या जनावरांसाठी राहत्या घरापासून जवळच कडबा चारा रचून ठेवला होता. तसेच ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी चारा ताडपत्रीने झाकून ठेवला होता. मात्र ( दि .१ ) रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोंडेकर हे घराबाहेर आले असता, रचुन ठेवलेल्या दोन्ही वळईला आग लागल्याचे लक्षात आले.
त्यांनी आग पाण्याने विझविण्याचा प्रयन केला. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जनावरांचा संपुर्ण चारा आगीत खाक झाला आहे. यामध्ये सुमारे २५ हजाराचे नकमान झाले आहे.