न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- चाकरमान्यांना दिवाळीला गावी जाण्यासाठी वल्लभनगर एसटी आगारातून जादा बसचे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वल्लभनगर आगार प्रशासनाकडून ८५ टक्के एसटी मार्गावर बस धावण्यास सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात एक ते वीस नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात जादा एसटी बस धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, चिपळूण, दापोली या भागात जाणा-या प्रवाशांची संख्या आणि प्रतिसाद बघून वेळेवर अतिरिक्त बसचे नियोजन नियोजन करण्यात आले आहे. सध्या दररोज ३० ते ४० फे-या सुरू आहेत. त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे.
तसेच ४० प्रवाशांची संख्या असल्यास ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. आरक्षित तिकीटाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सध्या तरी महामंडळाकडून कोणताही दरवाढ करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे मार्चपासून ते सप्टेंबरपर्यंत महामंडळाच्या बस बंद होत्या. त्याचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला बसला आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.