- मात्र, घटनापीठाकडून कोणताही निर्णय नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ज्या गोष्टीकडे लागले होते, त्या मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पूर्ण झाली आहे. आजच्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय दिला नाही. उलट पुढील सुनावणी ही ५ फेब्रुवारीला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
२५ जानेवारी रोजी होणारी सुनावणी आजच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे घेण्यात आली. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडली.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. मराठा आरक्षणावरील सुनावणी सोमवार २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर घटनापीठाच्या न्यायमूर्तीने चर्चा करून पुढील सुनावणीही ५ फेब्रुवारीला घेण्यात येईल, असे नमूद केले आहे.