- एनटीएजीआय पॅनेलचा केंद्र सरकारला सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) पॅनेलने हा सल्ला दिला आहे. याच पॅनलने आता सरकारला कोरोनामुक्त झालेल्यांचं लसीकरण करोनामुक्तीनंतर नऊ महिन्यांनी करण्यात यावं असा सल्ला दिलाय.
तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणाऱ्या या पॅनलने दोन डोसांमधील अंतर किती असावं यासंदर्भात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधील अंतर वाढवण्यात यावं असं म्हटल्याचं समजतं.
पॅनलने दिलेल्या सल्ल्यानुसार संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अॅण्टीबॉडीज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल. इतकच नाही तर गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही करोनाची लस देण्यात यावी असा सल्लाही या पॅनलने दिला आहे. आरोग्य मंत्रालय यासंदर्भातील निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.