- त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. या वादावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेसाहेबांच्या मागे ठाम उभे आहोत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बोलण्याच्या भरात कदाचित राणे साहेब ते बोलले असतील, ते वापरायचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. तथापि मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचे पद आहे, त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री विसरतात, यामुळे कोणच्या मनात संताप होऊ शकतो, तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो” “वासरू मारलं तर आम्ही गाय मारू हे योग्य नाही, भाजप राणे यांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल मात्र राणे यांच्या पाठीशी उभा राहील,