- अन्यथा योजनेपासून वंचित व्हाल; पालिकेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी दिव्यांगाना नागरवस्ती विकास योजना विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र, त्यासाठी हयातीचा दाखला आवश्यक आहे.
तो अद्यापही लाभार्थींनी सादर केलेला नाही. अशांनी (दि. ३०) पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये (कार्यालयीन सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामधील मदत केंद्रामध्ये हयातीचा दाखला जमा करावा.
हा दाखला मुदतीत सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, असा इशारा नागरवस्ती विकास योजना विभागाचे उप आयुक्त चारठाणकर यांनी दिला आहे.