- पालिकेकडून नदीकाठच्या रहीवाशांना दक्षतेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- पवना धरणात १०० टक्के पाणी साठा झालेला असुन धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे.
धरणामध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज मंगळवारी (दि. २१) रोजी सायं. ४.०० वाजता विद्युत जनित्राद्वारे १३५० क्युसेक्स व सांडव्याद्वारे २१०० क्युसेक्स असा एकुण ३४५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे.
पवना धरणाच्या नदी तीरावरील सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे. जेणे करून कुठलीही जिवित व वित्तहानी हाेणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.